बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर
Dr Babasaheb Ambedkar
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचे सुपुत्र होते. ब्रिटिश फ़ौजेत असल्या कारनाने वडीलांच्या सतत बदल्या होत असत
डॉ भीमराव रामजी आंबेडकर दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील सेवा निवृत्त झाले.तर ते सहा वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.
बाबासाहेबांचे शालेय शिक्षण मुंबई सातारा आशा विविध ठिकानी झाले व उच्च शिक्षण मुंबई , अमेरिका ,लंडन , जर्मनी, आशा विविध ठिकानी झाले लहान असताना त्यांच्या आई चे निधन झाले त्यानंतर बबसाहेबांना त्यांच्या वडिलांच्या बहिणिने सांभाळ केला 1907 मध्ये मॅट्रिक ची परीक्षा पास झाले व त्या नंतर लगेचच त्यांच लग्न झाले
बाबासाहेबांनी एल्फिन्स्टन कॉलेज मधुन पदवी चे शिक्षण घेतले या शिक्षनासाठी त्यांना बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती देन्यात आली होती. पदवी संपादन केल्यानंतर काही क़ाळ बडोदा संस्थानमध्ये त्यानी नोकरी केली त्याच काळा मधे त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
1913 या वर्षात बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले त्या नंतर त्यांच्या आयुष्याला कलाटनी मिळाली
त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून 1915 आणि 1916 मध्ये अनुक्रमे एमए आणि पीएच.डी. पदवी प्राप्त केली.
त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले तेथे त्यांना ग्रेज इन फॉर लॉमध्ये प्रवेश देण्यात आला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये डी.एससीची पदवी घेतली.
पण बडोद्याच्या दिवाणांनी त्यांना भारतात परत बोलावले. पुढे त्यांनी बार-ऍट -लॉ आणि डी.एस्सी. पदवी देखील मिळवली. त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठातही काही काळ शिक्षण घेतले.
1916 मध्ये त्यांनी ‘भारतातील जाती - त्यांची व्यवस्था , उत्पत्ती आणि विकास’ हा शोध निबंध वाचला. 1916 मध्ये त्यांनी ‘भारताचा राष्ट्रीय लाभांश - एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास’ हा प्रबंध लिहिला आणि पीएच.डी. पदवी मिळवली.
"ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती'' या शीर्षकाखाली आठ वर्षांनंतर हा प्रबंध प्रकाशित झाला.ही सर्वोच्च पदवी प्राप्त केल्यानंतर, काही काळ बडोद्याच्या महाराजांचे लष्करी सचिव म्हणून त्यांनी कार्य केले
परंतु हे काम करत असताना इतर लोकांची वागणूक सतत असपृश असल्याची जाणिव होत होतीत्या मुळे हे काम सोडुन पूढे ते मुंबई ला आले
बाबासाहेबानी त्या नंतर मुंबई च्या सिडनहॅम कॉलेजमध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले त्यांचे वाचन चांगले असल्याने ते विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. पण लंडनमध्ये कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
कोल्हापूरच्या महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली. 1921 मध्ये त्यांनी आपला प्रबंध लिहिला. "ब्रिटिश भारतातील इम्पीरियल फायनान्सचे प्रांतीय विकेंद्रीकरण" आणि त्यांनी लंडन विद्यापीठातून एम.एससी.ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात काही काळ घालवला. 1923 मध्ये, त्यांनी डी.एससी. ही पदवी घेण्यासाठी "प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन" हा प्रबंध सादर केला.आणि त्याचवर्षी म्हणजे 1923 मध्ये त्यांना वकीलांच्या बारमध्ये बोलावण्यात आले.
1924 मध्ये इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांनी पीडित- शोषित असलेल्या वर्गाच्या कल्याणासाठी त्यांनी एक संघटना सुरू केली. या संघटनेचे ‘प्रेसिडेंट’ सर चिमणलाल सेटलवाड होते तर अध्यक्ष डॉ. आंबेडकर होते. शिक्षणाचा प्रसार करणे, आर्थिक परिस्थिती सुधारणे आणि निराश वर्गाच्या तक्रारींचे प्रतिनिधित्व करणे ही या संघटनेची तत्कालीन उद्दिष्टे होती
नवीन सुधारणांच्या संदर्भात पीडित- शोषित वर्गाच्या समस्यांमागची कारणे शोधून त्यांचे निराकरण करण्यासाठी, 3 एप्रिल 1927 रोजी ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.
1928 मध्ये ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, बॉम्बे म्हणजेच मुंबईच्या शासकीय विधि महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झाले आणि 1 जून 1935 रोजी ते त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. 1938 मध्ये राजीनामा देईपर्यंत ते याच पदावर राहिले.
13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पीडित- शोषित वर्गाची प्रांतीय परिषद झाली. या परिषदेत त्यांनी एक घोषणा करून हिंदूंना हादरा दिला. "मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही" त्यांच्या हजारो अनुयायांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.1936 मध्ये त्यांनी ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’ महार परिषदेला मार्गदर्शन केले आणि हिंदू धर्माच्या त्यागाचा पुरस्कार केला.
त्यानी केलेल्या हया घोषणे मुळे सर्वत्र खळबळ उड़ाली
15 ऑगस्ट 1936 रोजी त्यांनी पीडित- शोषित वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली. यामध्ये मुख्यतः कामगारांची संख्या मोठी होती.
1938 मध्ये काँग्रेसने ‘अस्पृश्य’ या नावामध्ये बदल करणारे विधेयक आणले. त्यावर बाबासाहेबानी टीका केली. त्यांच्या दृष्टिकोनातून नाव बदलणे हा समस्येवरचा उपाय नव्हता समाजतील माणसाची नैतीकता मधे बदल झाला पहिजे
1942 मध्ये, भारताच्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेत, कामगार सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1946 मध्ये ते बंगालमधून संविधान सभेवर निवडून आले. त्याच वेळी त्यांनी ‘शुद्र कोण होते? हे आपले पुस्तक प्रकाशित केले.
स्वातंत्र्यानंतर, 1947 मध्ये, नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांची कायदा आणि न्याय मंत्री म्हणून नियुक्ती झाली. परंतु 1951 मध्ये त्यांनी काश्मीर प्रश्न, भारताचे परराष्ट्र धोरण आणि हिंदू कोड बिल, याबाबत नेहरूंच्या धोरणावरून मतभेद व्यक्त करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यामधील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून, 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने, त्यांना LL.D ची पदवी बहाल केली. 1955 मध्ये त्यांनी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स हे आपले पुस्तक प्रकाशित केले.
12 जानेवारी 1953 रोजी उस्मानिया विद्यापीठाने, डॉ.बी.आर. आंबेडकर यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली. "मी हिंदू म्हणून मरणार नाही" ही 1935 साली नाशिक येवला इथे केलेली आपली घोषणा, त्यांनी अखेर 21 वर्षांनंतर खरी ठरवली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या ऐतिहासिक समारंभात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले.
1954 मध्ये नेपाळ मध्ये काठमांडू इथे झालेल्या "जागतिक बौद्ध धर्म परिषदेत", बौद्ध भिक्खूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "बोधिसत्व" ही पदवी प्रदान केली होती. विशेष म्हणजे बाबासाहेब हयात असतानाच त्यांना बोधिसत्व ही पदवी बहाल करण्यात आली होती.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुधारणांमध्येही त्यांनी योगदान दिले. याशिवाय रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेतही बाबासाहेबांनी मोलाची भूमिका बजावली. बाबासाहेबांनी हिल्टन यंग कमिशनसमोर मांडलेल्या संकल्पनेवर मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली होती.
३ हि गोलमेज़ परिषदेला बाबासाहेब उपस्थित होते
डॉ. आंबेडकरांचा हा दिमाखदार जीवन प्रवास, त्यांच्या अभ्यासू आणि कृतीशील व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतो. सर्वात प्रथम, त्यांनी अर्थशास्त्र, राजकारण, कायदा, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान संपादन केले. शिक्षण घेताना त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागले.
पण त्यांनी आपले आयुष्य केवळ वाचन-अभ्यास आणि ग्रंथालयात व्यतीत केले नाही. त्यांनी आकर्षक पगाराची उच्च पदे नाकारली, कारण ते शोषित वर्गातील आपल्या बधुंना विसरले नाहीत. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित केले. पिचलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
बाबासाहेबांना महामानव भारतरत्न मानवतेचा मुक्तिदाता, शेतकरी, कामगार, कष्टकरी, बहुजन समाजातील मार्गदाता, स्त्रिया, बालके आणि वृद्ध यांच्या कल्याणाचा उद्गाता, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या जगभरातील हजारो चळवळीचा जनक, दीपस्तंभ, भारतीयच नव्हे तर विश्वाच्या सर्वांगीण प्रगतीचे मानक तयार करणारा थोर विचारवंत,
पुस्तकांसाठी घर बांधणारा जगातील एकमेव ज्ञानी, ब्रिटिशांना "भारतीय लोक आता तुमची गुलामी कदापि करणार नाहीत" असे ठणकावून सांगणारा क्रांतिकारी देशभक्त, प्रोफ. सेलिगमन, जॉन ड्युई अशा गुरूंना आपल्या तल्लख प्रतिभेने प्रभावित करणारा
विद्यार्थी संशोधक, इतिहास, राज्यशास्त्र,मानव वंश शास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, युद्धशास्त्र, आंतर राष्ट्रीय संबंध, नियोजन, पाणी व्यवस्थापन शास्त्र, भौतिकी, स्थापत्य, विद्युत शास्त्र अशा विविध विषयांतील विद्वान, आधुनिक भारताचा निर्माता, जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवा
यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म पुनरुज्जीवित करून जगातील दुसरे धम्मचक्र प्रवर्तन करणारा धम्म वेत्ता, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील सर्वोच्च मानबिंदू असलेल्या राज्यघटनेचा निर्माता, युगप्रवर्तक, विश्वरत्न, विश्र्वभूषण, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आशा विविध पदव्या देन्यात आल्या आहेत
अशा महामानवास विनम्र अभिवादन !!


0 Comments
सदर वेबसाइट हि माहिती हेतू आहे या मध्ये असलेल्या महिती ची पुष्टी वेबसाइट करत नाही केवल आपल्या ज्ञानामध्ये भर घालन्या चा हा छोटासा प्र्यत्न आहे